Chanakya Mandal Pariwar

नोकरी नाहीलोकसेवा

रणरणत्या उन्हाळ्यात कोरडंठक्क पडलेलं रान असतं.

एका ठिणगीचा अवकाशकी ते सारं रान पेटून उठतंअसं काहीसं पूजा खेडकर प्रकरणाबाबत होत आहे

पूजा खेडकर २०२३ च्या तुकडीचीमहाराष्ट्र केडरची आयएएस अधिकारीपहिली दोन वर्षं आयएएस अधिकार्‍याच्या प्रशिक्षणाचा कालावधी असतोत्यापैकी दोन भागांत वाटलेलं साधारण १२ महिन्यांचं प्रशिक्षण मसुरीच्या लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इथं होतंया दोन भागांमधल्या सुमारे एका वर्षाच्या काळात जिल्ह्यात प्रशिक्षण घ्यायचं असतं.

महाराष्ट्रातली ही व्यवस्था अतिशय कल्पक आणि सुनियोजित आहेया एक वर्षाच्या कालावधीपैकी पहिले सहा महिनेत्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यासोबत घालवून प्रशासन जवळून पाहणंसमजून घेणं आणि शिकायचं असतंदुसर्‍या सहा महिन्यांतआयएएस अधिकारी म्हणून स्वतंत्र कार्यभार मिळाल्यानंतरजे विभाग किंवा पदांचा वरिष्ठ म्हणून पुढं काम करायचं आहेअशा हाताखालच्या सर्व पदांवर आधी स्वतः काम करायचं असतंयात नगरपालिकेचा मुख्याधिकारीतालुक्याचा गटविकास अधिकारीतहसीलदार आणि एका तालुक्याचा प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी अशा त्या जबाबदार्‍या असतातप्रशिक्षणाधीन अधिकार्‍यानं हे सर्व विभागत्यांचं काम खोलात जाऊन समजून घेणं अपेक्षित आहे.

खरं म्हणजेया रचनेतविशेषतः जिल्हाधिकार्‍यासोबत राहून प्रशासन शिकताना प्रशिक्षणाधीन अधिकार्‍याची वेगळी केबिनत्याची वेगळी टेबलखुर्ची अभिप्रेतसुद्धा नाहीया काळात अधिकार्‍यांकडे कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतातमुळात एकूण प्रशासन एका आयएएस अधिकार्‍याशी एका अदबीनं आणि सन्मानानं वागतंच.

मात्रपूजाच्या बाबतीत जे काही बाहेर येत आहेते दुर्दैवानं धक्कादायक आहेजाणार्‍या दिवसागणिक समोर येणार्‍या गोष्टी चमत्कारिक आहेतखरंतर प्रशिक्षणाधीन अधिकार्‍याचे आपल्या जिल्हाधिकार्‍याशी आयुष्यभरासाठी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध तयार होतातमी प्रशिक्षणार्थी असताना व्हीपीराणेसाहेब कलेक्टर होतेमाझे त्यांच्याशी आणि जिल्हाधिकारी चित्कला झुत्शी मॅडम यांच्याशी आयुष्यभराचे ऋणानुबंध आहेतपण पूजाच्या डोक्यात यश गेल्यामुळं या नात्यातली हृद्यता संपून गेली आणि आता वेळ काय आली तर कलेक्टरनं २५ पानी अहवाल पाठवून सांगितलं कीदुसर्‍या जिल्ह्यात यांची व्यवस्था कराही बाब दुर्दैवी आहेतिथंपासून बाहेर येणारे सगळे प्रकार अनिष्ट आहेत.

म्हणून पूजानं केलेली केबिनची मागणी, ‘ऑडी’सारखी खासगी गाडीत्यावर ‘महाराष्ट्र शासन’ लिहिणंत्या गाडीला सरकारी दिवा लावणं या गोष्टी प्रशिक्षणाधीन अधिकार्‍याला शोभा देत नाहीतकाही मार्गांनी तिचे किंवा तिच्या वडिलांचे अधिकार्‍यांशी झालेले संवाद बाहेर आले आहेतते जर तसेच्या तसे असतील तर त्यांनासुद्धा अनिष्टच म्हणावं लागेलपूजाचे वडील सरकारी कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकार्‍यांना काही अयोग्य बोलून आलेसंबंधित अधिकारी ते ऐकून का घेत होतेहा माझ्या मनातला प्रश्न आहेहे असं बाहेर यायला सुरू झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा देताना पूजानं ओबीसी संवर्गातून अर्ज करताना आपण क्रिमी लेयरमध्ये बसतो असं सांगत राखीव जागेचा लाभ घेतल्याचं समोर आलंमात्र तिच्या आईवडिलांची संपत्ती कोट्यवधींची असल्याचं दिसून येतंमात्र आईवडिलांपासून आपण वेगळी राहत असूनमाझी स्वतःची उत्पन्नाची कोणती साधनं नाहीत असं पूजानं यूपीएससीला सांगितलं असल्याचं कळतंयशिवाय अपंगत्वाचं प्रमाणपत्र देत तिनं त्या जागेचा लाभ घेतला असल्याचं दिसत आहेम्हणून आता त्या प्रमाणपत्रावरदेखील प्रश्न उपस्थित होत आहेत.

मग खेडेकरांच्या बंगल्याचं अतिक्रमण आता त्यांनी काढलंप्रशिक्षण सुरू असताना पूजानं काही अन्य अधिकार्‍यांना फोन करून धमक्या दिल्या होत्यातिच्या आईनं मुळशी तालुक्यातील काही शेतकर्‍यांना हातात पिस्तूल घेऊन धमकावल्याचं समोर आलंखासगी गाडीवर सरकारी दिवा लावल्याबद्दल कारवाई करण्यासाठी पूजाच्या घरी पोचलेल्या पोलिसांना जेलमध्ये टाकण्याची धमकी तिच्या आईनं दिलीआता या सगळ्यावर कारवाई सुरू आहेहा लेख लिहिताना कळतंय की पुणे ग्रामीण पोलिसांनी तिच्या आईला अटक केली आहे.

पूजाने यूपीएससी नागरी सेवेचे एकूण किती प्रयत्न दिले यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेओबीसी संवर्गात नऊ प्रयत्नांना परवानगी आहेपुढं तिनं नाव बदलून आणखी दिले की काय याचा तपास सुरू आहेहा सगळं प्रकारच अजब आणि धक्कादायक आहेलाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशननं तिचं प्रशिक्षण स्थगित केल्याचं अधिकृत पत्र देत २३ जुलैपूर्वी मसुरीत दाखल होण्यास सांगितलं आहेप्रशासनाकडून उचललेलं हे पाऊलदेखील अत्यंत गंभीर आहेउपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांवर पूजाला तिचं म्हणणं मांडण्याची संधीआवश्यक कागदपत्रं सादर करण्याची संधी दिली जाऊन प्रशासकीय शिस्तीनुसार पुढची कार्यवाही होईलअ‍ॅकॅडमी आणि केंद्र सरकारचं डिपार्टमेंट ऑफ पर्सोनल अँड ट्रेनिंग यांच्यामध्ये त्यावर चर्चा होईलजर त्यांना वाटलं तर तिला वर्तणुकीबाबत समज दिली जाऊ शकते किंवा निवड रद्दही केली जाऊ शकतेमागील काळात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्याचे मला स्मरणात आहेमाझ्या मतेया प्रकरणाच्या मूळ तपासातून जर दुसर्‍या एखाद्या अ‍ॅथॉरिटीने अयोग्य दाखला दिल्याचे निष्पन्न झाल्यास त्या अ‍ॅथॉरिटीवरही कारवाई होऊ शकते आणि झालीच पाहिजे.

मात्र घडत असलेल्या या घडामोडींमुळं पूजा खेडकर या आयएएस असलेल्या एका व्यक्तीपलीकडं जाऊन अनेक अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित होतातभारतातली किंवा जगातलीसुद्धा म्हणता येईल अशी अत्यंत अवघड असलेली नागरी सेवेची स्पर्धापरीक्षात्यातून होणारी निवडत्यानंतर होणारं प्रशिक्षणमग होणारी पदस्थापनात्यांनतर होणार्‍या विविध बदल्याकालानुक्रमानुसार होणारी पदोन्नती इसंदर्भात अनेक मूलभूत प्रश्न निर्माण होतात.

एकसर्वसाधारणपणे राखीव जागांच्या विविध तरतुदी आणि त्यात विविध प्रकारच्या अपंगत्वाच्या राखीव जागांच्या तरतुदी यांचा कुठं गैरफायदा घेतला जातो आहे कापूजाच्या बाबतीत वैद्यकीय अधिकार्‍यानं दिलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा तपास होईलचमात्र हे एकट्या पूजापुरतं मर्यादित नाहीअशा प्रकारे राखीव जागांचात्यातही अपंगत्वाचा कुठं गैरफायदा घेतला जातो आहे कादिशाभूल करणारी प्रमाणपत्रं दिली जात आहेत कायाचासुद्धा सखोल तपास होणं आवश्यक आहे.

दुसरा गंभीर प्रश्न यूपीएससीद्वारे घेतल्या जाणार्‍या स्पर्धापरीक्षांबाबत आहेतर्‍हातर्‍हांचे जुगाड करतअंतिमतः अयोग्य पद्धतीनं काहीजण निवडले जात असतील तर अक्षरशः दिवसरात्रकसून अभ्यास करणार्‍या अनेक प्रामाणिक मुलामुलींच्या मनात प्रश्न आणि काळजी निर्माण होतेयूपीएससीची कार्यपद्धती आणि निवडपद्धतीसमोर प्रश्न निर्माण होतातदेश चालवणार्‍या अनेक व्यवस्थांपैकी यूपीएससी ही एक पारदर्शक आणि विश्वसनीय व्यवस्था आहे असं माझं निश्चित मत आहेएका प्रकरणामुळं या संपूर्ण व्यवस्थेवर शंका उपस्थित करणं अयोग्य आहेमनापासून अभ्यास करणार्‍या युवकांनीदेखील या प्रकरणामुळं निराश होण्याची आवश्यकता नाहीइतकंच नाहीकुणा एका उमेदवाराने व्यवस्थेतल्या त्रुटी हेरूनजुगाड करून तथाकथित यश आपल्या पदरात पाडून घेतलं म्हणून यूपीएससीद्वारा यश मिळवणारे बहुसंख्यजण असंच करतातअसं मानायचंदेखील कारण नाहीआपण असं मानू लागलो तर खरंच अभ्यास करतआपल्या गुणवत्तेचं खणखणीत नाणं वाजवतशासकीय सेवेत प्रवेश मिळवणार्‍यांवर तो अन्याय होईलचाणक्य मंडलमधून अपंगत्व असणार्‍या अनेक मुलामुलींनी तयारी करून उत्तुंग यश मिळवलं आहेआयएएस झाले आहेतयातील जयंत नावाच्या एका मराठी मुलाला महाराष्ट्र केडर मिळालं नाहीतो गुजरात केडरमध्ये काम करतो आहेगुजरातमधील वरिष्ठ अधिकारी मला सांगतात की तो अतिशय मनापासून काम करतो आहेतो आपल्या अंधत्वाचं भांडवल करत नाहीकुठल्याही सवलती मागत नाहीडोळे असणार्‍या अधिकार्‍याइतकं उत्तम काम तो करतोत्यामुळं पूजाच्या प्रकरणाचं सरसकटीकरण करून यूपीएससी व्यवस्थेला दोषी ठरवणं आणि सर्वच अधिकार्‍यांकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहणं चुकीचं ठरेलंमात्रएक स्वायत्त आणि घटनात्मक यंत्रणा म्हणून चांगल्या गुणवत्तेचे उमेदवार निःपक्षपातीपणे आणि पारदर्शक रीत्या निवडूनदेशाचं प्रशासन चालवण्यासाठी ते सरकारकडं सोपवणं हे यूपीएससीचं काम आहेयूपीएससीनं आपली जबाबदारी पार पाडल्यानंतर पुढं सरकारच्या कार्मिक मंत्रालयाची (Department of Personnel and Training) जबाबदारी आहेहे अधिकार्‍यांची सेवात्यांचं केडर याविषयीचे निर्णय घेतंत्यामुळं पूजाच्या निमित्तानंहा विषय पूजापुरता मर्यादित न ठेवताअशा प्रकरणांच्या पूर्ण तळाशी जाऊन शोध घेणं आणि कागदपत्रंकायदेसाक्षीपुराव्यानिशी सिद्ध झाल्यानंतर कठोर कारवाई करणंही केंद्र सरकार आणि यूपीएससीची जबाबदारी आहे.

मागील काळात यूपीएससीची प्रक्रिया अधिक चांगली करण्यासाठी तत्कालीन सरकारनं दोन समित्या नेमल्या होत्याया समितीनं अभ्यास करुन सूचना कराव्यात असं ठरवण्यात आलं होतंमला त्या समित्यांसमोर उपस्थित राहून म्हणणं मांडण्याची संधी मिळाली होतीत्यात मी एक मुद्दा मांडला होता – प्रशासकीय अधिकार्‍यांची नीतिमत्ताहे पदही खुर्ची माझी नाहीती खुर्चीते अधिकार डोक्यात जाता कामा नयेतयासाठी आपला छान भारतीय शब्द आहे ‘इदं न मम’ याचं कारणहाती आलेली सत्ता सांभाळावी लागतेसत्तेचा स्वभाव विचित्र असतोअ‍ॅब्सोल्युट पॉवर करप्टस् अ‍ॅब्सोल्युटलीत्यामुळं अधिकार्‍यांकडं चारित्र्याचाही कणा असावा लागतो आणि व्यवस्थांचंही एकमेकांवर नियंत्रण असावं लागतंया समितीच्या शिफारशींनंतर एथिक्सइंटिग्रीटी अँड अ‍ॅप्टीट्यूड हा पेपर यूपीएससी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालाया पेपरच्या सिलॅबसमध्ये फाऊंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच प्रशासनाची मुलभूत तत्त्वं काय आहेततुम्ही काय घेऊन जगायचं आहे आणि प्रोबिटीइंटिग्रिटीअकाऊंटॅबिलिटीकम्पॅशन फॉर वीकर सेक्शन्स आदी अनेक बाबींचा समावेश आहेप्रश्न असा आहे कीअभ्यासक्रमात असलेली तत्त्वं आचरणात येतात का?

दुर्दैवानं याचं उत्तर नाही असं आहेहा मानवी अस्तित्वाचाच मुलभूत मुद्दा आहेप्राचीन तत्त्वज्ञ प्लेटो यांनी सांगितलेलं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे – कॅन व्हर्च्यू बी टॉटसद्गुण शिकवता येतात कापेपर हे त्याचं साधन असू शकतंपण तेवढं पुरेसं नाहीयेत्याची पहिली जडणघडण घरामध्ये होतेसंस्कारातूनत्यानंतर शिक्षणपद्धतीतमग पुढं समाज नावाच्या व्यवस्थेमध्ये आणि त्या व्यवस्थेचाच एक घटक असणारं प्रशासनदुर्दैवानं आता जे घडतंय त्याचा एक अर्थ यूपीएससीच्या पेपर जीएस४ मधलं सार स्वभावात उतरत नाहीये.

असे अनिष्ट प्रकार होणार असतील तर आम्ही अभ्यास करून काय उपयोगअशी भूमिका अभ्यास करणार्‍या कोणाही युवकानं बाळगू नयेया अशा काही प्रकारणांमुळं जे युवक अशी शंका घेऊ लागतील त्यांच्याजवळ कणखर मनाचा अभाव आहेअसं म्हणावं लागेलउद्या प्रशासन सांभाळण्याच्या त्यांच्या क्षमतेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होतंम्हणून मी हे निश्चितपणे सांगतो कीयूपीएससी असो किंवा एमपीएससीकचकावून अभ्यास करत स्वतःचास्वतःच्या जीवनाचा पाया पक्का करण्याचं काम निःशंक मनानं करावं.

अखेरसगळ्यात मूलभूत मुद्दा प्रशासकीय सेवेबाबतचाप्रशासकीय सेवा ही नुसती नोकरी नाहीही लोकसेवा आहेहे नुसतं भाबडंनैतिक वाक्य नाहीहे राज्यघटनेनुसारचं निव्वळ वाक्य आहेमी ज्याला ‘आपल्या सुदैवानं’ असे शब्द वापरतोकी घटनाकारांनी भारत देशाचं सार्वभौमत्व लोकांच्या हाती ठेवलंप्रशासकीय अधिकारी लोकांचे सेवक असतीलआपण लोकांचे सेवक आहोत याचं सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांनी नुसतं भान नाहीतर त्याचा अभिमान बाळगला पाहिजेमात्रदुर्दैवानं लोकसेवेचा हा दृष्टिकोन बाजूला राहतोप्रशासकीय सेवेसोबत येणारा पैसासुरक्षिततासामाजिक स्थान आणि सत्ता डोक्यात जाते.

एका बाजूलाया परीक्षेची तयारी करणारे आणि सेवेत जाणार्‍यांनी स्वतःला असं घडवायला हवंकी सेवेत दाखल झाल्यानंतर ज्या सोयीसुविधा मिळत आहेतत्या माझ्या नाहीतलोकांच्यालोकांसाठी आहेतमात्रस्वातंत्र्याची पंचाहत्तरी ओलांडूनही दुर्दैवानं प्रशासनाचा – ‘आम्ही म्हणजे सत्ताधारी’ हा दृष्टिकोनही गुर्मी जात नाहीती जाण्यासाठी आणि त्याजागी हा लोकसेवेचा वारसा येण्यासाठी प्रशासनात अनेक मूलभूत बदल आवश्यक आहेतब्रिटिशांनी घालून दिलेली वसाहतवादी आणि सत्ताधारी मनोवृत्तीची प्रशासनाची मुख्य रचना आपण चालू ठेवली आहे.

याचं दुर्दैवानं एक स्पष्ट उदाहरण द्यायला पाहिजेते म्हणजेआजही आपल्या घटनात्मक तरतुदींनुसार प्रशासन थेट लोकांना उत्तरदायी नाहीते लोकप्रतिनिधींना उत्तरदायी आहे आणि ते लोकप्रतिनिधी लोकांना उत्तरदायी आहेतव्यवस्थेच्या या रचनेमुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येतआपली मनमानी करण्याची घटनात्मक व्यवस्थाच तयार होतेत्यामुळं प्रशासन लोकांना थेट उत्तरदायी बनवण्यासाठी पावलं उचलली जायला हवीतती झाली तर भ्रष्टाचार कमी किंवा दूर होऊन प्रशासन अधिक पारदर्शक आणि लोकांना उत्तरदायी बनेल.

वर्तमानात प्रशासकीय अधिकार्‍यांसंदर्भातली परिस्थिती अतिशय अनिष्टभीषण आणि दुःखद आहेअशी असल्यामुळं खर्‍या घटनात्मक तरतुदींचं रुपांतर आता आदर्शवाद आणि भाबडेपणा या शब्दांत झालं आहेवस्तुतः या तरतुदी राज्यघटनेतल्या आहेतअख्ख्या जगात केवळ भारतीय राज्यघटनेमध्ये सरकारी यंत्रणेला कलम ३११ अंतर्गत लेखीघटनात्मक संरक्षण देण्यात आलेलं आहेयानुसार एकदा निवड झाली आणि सेवेमध्ये कायम झाल्यानंतर अधिकार्‍यांविरोधात सहजासहजी कारवाई करता येत नाहीया संरक्षणामुळेच देशाचीराज्याचीजगाची आर्थिक स्थिती काहीही असली तरी सरकारी अधिकार्‍यांचा पगार वेळच्या वेळी जमा होतोचतोही टीएडीएइन्क्रिमेंट वगैरेंसहहे अतिसंरक्षण यासाठी आहे कीअधिकारी पदावरील व्यक्तीनं कौटुंबिक जबाबदार्‍यांच्याआर्थिक चिंता मागे सारून लोकांच्या कल्याणासाठी समर्पित भावानं कार्यरत व्हावंमाझं वैयक्तिक मत आहे कीहे संरक्षण असता कामा नयेयाचं एक कारणपरफॉर्मन्सशी याचं दूरपर्यंत नातं नाहीयेअधिकार्‍यानं काम केलं नाही तरी त्याचा पगार मिळत राहतोपदोन्नतीही मिळत राहतेम्हणजेच एखाद्या अधिकार्‍यानं दिवसाचे १६१८ तास झिजून काम केलं आणि लोकांच्या कल्याणासाठी नवनवे रस्ते शोधले तरी त्यालाही मिळायचं तेव्हाच प्रमोशन मिळतं आणि एखादा अधिकारी हातावर हात ठेवून दिवस ढकलत राहिला तरी त्यालाही प्रमोशन मिळतंवास्तविकवेतन आणि प्रमोशन या दोन्ही गोष्टी परफॉर्मन्स – कामाशी जोडल्या गेल्या पाहिजेत.

व्यवस्थेतल्या या बदलांसोबत हवं – चरित्रनिर्माणकारण कोणतीच व्यवस्था कधी परिपूर्ण असू शकत नाहीतिची वर्तणूक ती चालवणार्‍यांचं ‘शील’ यावरून ठरतेदेशाची राज्यघटना तयार होऊन ती देशाला अर्पण करताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, The constitution is as good or as bad as the people who would implement it. आम्ही तयार केलेली राज्यघटना किती चांगली आहेयावर आंबेडकरांचं अत्यंत दूरदर्शी उत्तर आहे – ही राज्यघटना अमलात आणणारे किती चांगले आहेत यावर ते ठरेल!

म्हणूनएका बाजूला व्यवस्थेतलं परिवर्तन आणि त्याचवेळी ती व्यवस्था चालवणार्‍यांचं चरित्रनिर्माण अशा दोन्हींची आवश्यकता अधोरेखित होतेतेव्हा पूजाच्या निमित्तानं लोकांच्या मनातला पेटलेला वणवा जेव्हा व्यवस्था परिवर्तन आणि चरित्रनिर्माणाकडं जाईलतो देशासाठीचा सुदिनच.

Main

This will close in 0 seconds