Chanakya Mandal Pariwar

सर्वांना ही दीपावलीयेणारं नवीन वर्ष आणि सर्व आयुष्यातसुखसमाधानयशआनंद लाभोया शुभेच्छा! – अशी माझी ‘शुभ दीपावली’ची शुभेच्छा!

या शुभेच्छा व्यक्त करतानाची माझी भावना आहेकी एका अत्यंत धोकादायक कालखंडातली ही दीपावली आहेएका अत्यंत धोकादायक कालखंडाच्या सावलीत ‘शुभ दीपावली’ या शुभेच्छाही प्रार्थना मी व्यक्त करतो आहे.

आपल्या भारतीय संकल्पनांमध्ये कमालीचा सखोल अर्थ आणि त्यामुळं त्यात विलक्षण सौंदर्य भरलेलं आहेमी ‘सौंदर्य’ हा शब्द वापरतो आहेदीपावलीच्या शुभेच्छासुद्धा व्यक्त करायच्या झाल्या तर त्या आहेत ‘शुभ’ दीपावलीअलीकडं पाश्चात्त्यीकरणत्यातले ‘इंग्रजाळलेले’भाषेचंजाणिवांचं आणि त्यामुळं संस्कृतीचं ‘इंग्रजीकरण’ करणारे आणि त्यापायी आपलं ‘आत्मभान (self-awareness)’ हरवलेलेआपण कोणआपण कोणत्या मातीत रुजलेलो आहोतआपली आई कोणआपण कुठून उगवून आलो या सगळ्याचा जणू विसर पडल्यासारखं आपण जोरजोरात ‘हॅपी दिवाली’ म्हणतो!

हॅपी’ दिवालीगोष्ट आनंदाचीच आहेकी दीपावली आनंदमय जावोपण अर्थ आणि त्यामागची भावनाविचार समजल्यामुळं आता अनेक वर्षं मी संज्ञा वापरतो – ‘शुभ’ दीपावलीहा शब्द विलक्षण अर्थपूर्ण आहेकारण ही दिवाळी ‘आनंदी (हॅपी)’ तर असोचपण खरा आनंद कशात आहेकुणाला जर वाटलं ‘हॅपी’ दिवाली म्हणजे सिगरेटदारूतंबाखू आणि ‘हॅपी दिवाली’ म्हणजे बदललेल्या काळात फटाक्यांमुळं होणारं प्रदूषण. (की जे ‘भारतीय मन’ लक्षात घेतंभांडायलाखूनखराबा करायला उठत नाहीआपणहून मान्य करून ठरवतं की बदललेला काळपर्यावरणाची समस्या पाहता आपण फटाक्यांवर खर्च तरी करायला नको किंवा तो कमी करूयाहा आतून येणारा बदल आहे.) म्हणून ती ‘हॅपी दिवाली’ तर आहेचपण ती ‘शुभ दीपावली’ आहे.

भविष्यात आपल्याशी भारतीय संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांवर संवाद करताना कधीतरी अर्थशास्त्र या विषयावर सविस्तर बोलेनमात्र दीपावलीच्या प्रकाशात आज फक्त ‘शुभ लाभ’ ही संज्ञा सांगतोय.

पाडव्याच्या दिवशीबलिप्रतिपदेला नवसंवत सुरू होतंया दिवशी आपला व्यापारीवर्ग आपल्या व्यापाराच्या वह्यापुस्तकांची पूजा करतोव्यवसाय सात्विक भावनेनं करायचा आहेहे त्यामागचं अर्थपूर्ण पावित्र्यज्यात मी हिशोब ठेवतो तेच माझे सात्विकपवित्र धर्मग्रंथ आहेतया दिवशी व्यापारीबंधू त्या वहीवर स्वस्तिक काढतो आणि ओल्या कुंकवात खाली शब्द लिहितो – शुभ लाभ!

हा फार महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण शब्द आहेअर्थशास्त्रात नफा कमावणं (profit maximization) हा हेतू सांगितला जातोकोणत्याही व्यवसायात हा नफा वाढत गेला पाहिजेमाझ्या मतेहे अर्थशास्त्र अ‍ॅडम स्मिथपासूनजॉन मार्शल लॉर्ड केन्समिल्टन फ्रीडमन आणि कालपर्यंत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं यांनी मांडलेलं पाश्चिमात्त्य अर्थशास्त्र आहेहा नफा कमावत असताना मी कुणाचं शोषण करतो आहे काकुणाचं नुकसान होत आहे काअलीकडच्या काळाबद्दल बोलायचं झाल्यास व्यापारातून भरमसाठ नफा कमावताना त्याची किंमत पर्यावरण चुकती करत आहे काहा नफा आहेमात्र तो ‘शुभ लाभ’ नाहीव्यवसाय चालवायचा असेल तर ‘लाभ’ म्हणजे नफा हवाचमात्र तो दुसर्‍याला लुटूनत्याचं शोषण करूनखोटं बोलूनफसवून नाहीव्यापार करणं किंवा जीवन जगणं ही win win situation असायला हवीग्राहक म्हणून मी तुला वस्तू किंवा सेवा दिलीत्यातून तुझं आणि माझंही घर चालायला हवंम्हणून त्या व्यवसायातून नफा म्हणजे लाभ आवश्यक आहेपण तो ‘शुभ लाभ’ असायला हवातशी दीपावलीची ही शुभेच्छा – ‘शुभ’ दीपावली!

मला हे म्हणायला आवडतंकारण ती माझ्या हृदयातली खरीखुरी भावना आहे की मुळातच – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छाया अवस्थेत मी मुख्यतः जगतोअशा ‘सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा’ कायमच्याच आहेतमात्र दिवाळी हे त्या व्यक्त करण्याचं एक चांगलं निमित्तम्हणून ‘शुभ दीपावली’आपल्या सर्वांना सुखसमाधानयशआनंद लाभोयेणारं नवं संवतआपलं जीवन सुखसमाधान आणि आनंदानं भरून जावंआपल्यातून समाजदेशविश्व आणि निसर्गसुद्धा सुखसमाधान आणि आनंदानं भरलाभारला जावो.

॥ २ ॥

तरीही हे म्हणत असतानामाझ्या मनात एक लख्खजिवंत भान आहेकी आपण एका अत्यंत धोकादायक कालखंडात आहोततुमच्या माझ्या वैयक्तिक आयुष्यापासून ते महाराष्ट्रभारत आणि जग एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जात आहे.

नेमेचि येतो मग पावसाळा’प्रमाणे लोकशाही पद्धतीत ठराविक काळानं निवडणुका होताततशा आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ जाणलेले संत पुढं सांगतात – ‘हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’पावसाळा दरवर्षी येत असला तरी तो कंटाळवाणादरवर्षीच्या वेळापत्रकातला नाहीउलट सृष्टी ज्या तर्‍हेनं काम करतेतिचं हे कौतुक आहेतसं लोकशाहीचंही कौतुक म्हणजे निवडणूकमहाराष्ट्राची ती येऊ घातली आहेमात्र धोक्यांचा उल्लेख करताना मी फक्त निवडणुकांबद्दल बोलतोय असं नाहीअटलजी म्हणाले होते तसंनिवडणुका येतील आणि जातीलसरकारं येतील आणि जातीलमात्र देश या सर्वांच्या वर असून तो चालला पाहिजेमी म्हणत असलेला धोकादायक कालखंड हा देश चालवण्याच्या दृष्टीनं आहे.

माझं हे वैयक्तिक दुःख आहेकी ज्या महाराष्ट्राचं काम आहे देशासाठी काम करणंलढणंजीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रतिभेचा आविष्कार घडवणंदेशप्रश्नांवर मूलभूत अभ्यास करून त्यावर स्वतंत्र बुद्धीनं उपाय शोधणंत्या महाराष्ट्राच्या समकालीन चित्राकडंसंस्कृतीकडंसार्वजनिक जीवनाकडं बघताना हृदयाला हजारो इंगळ्या डसतात आणि प्रश्न पडतो की महाराष्ट्राला झालंय तरी कायम्हणून हा धोकादायक कालखंड आहे.

सध्या भारत देशही स्वातंत्र्यानंतरच्या एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जातो आहेस्वतंत्र भारताच्या वाटचालीचा अभ्यास करताना आणि कार्यकर्ता म्हणून काम करताना आतापर्यंत मला वाटत आलं आहे की स्वतंत्र भारताच्या वाटचालीतलं सर्वात धोकादायक दशक १९८० चं दशक आहेया दशकात ‘कार्यकर्ता’ म्हणून मी काम करत होतोया कामानं दिलेल्या दृष्टीतून पुढं अभ्यास करून आयएएस झालोया दशकात आपल्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही मागासलेली होतीआपल्या आर्थिक विकासाचा दर शरम वाटेल इतका कमी होताआर्थिक धोरणं फसत होतीलोकसंख्या वाढत होतीलोकांच्या आशाआकांक्षाअपेक्षा वाढत होत्यात्यांना आर्थिक विकासत्याची गती पुरी पडत नव्हतीत्याचवेळी देशाच्या विविध कानाकोपर्‍यात फुटीरतावादी चळवळी डोकं वर काढत होत्याबहुसंख्य फुटीरतावादी चळवळी दहशतवाद आणि हिंसेच्या मार्गानं चालल्या होत्याआता हा देश तुटतो की कायअसं चित्र निर्माण झालं होतं.

याच दशकात जम्मूकाश्मीरमध्ये दहशतवादानं डोकं वर काढायला सुरुवात केली होतीदहशतवादी संघटना तयार होऊन त्यांचा बेदरकारपणा वाढत होताया संघटनांना पाकिस्तानसहित अनेक भारतविरोधी शक्तींचा पाठिंबा होतापंजाबमध्ये खालिस्तानची मागणी होऊ लागलीशीख संप्रदायाचा इतिहास भारतभारतीय संस्कृतीसाठीतिच्या संवर्धनासाठी लढण्याचा इतिहास असताना त्यातल्या काहींचं डोकं फिरलंफिरवण्यात आलं की आम्ही वेगळेसबब आम्हाला भारतापासून फुटून निघायचं आहेनाहीतर आम्ही ‘भारतीयांच्या’ कत्तली करूमुळातला हसरा खेळता पंजाबप्रचंड उत्साही पंजाबआनंदी पंजाबनाचणारा पंजाबरंगीबेरंगी पंजाबहिरवागार पंजाबकष्टाळू पंजाबतगडा पंजाबखेळाडू पंजाबभांगडा खेळणारा पंजाब बघता बघता सूर्यास्ताला स्मशानात रूपांतरित झालेला आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना डोळ्यानं पाहिला.

भारताचा ‘पूर्वांचल’ आपापल्या कारणांमुळं खदखदत होताआसाममध्ये बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांची समस्या त्या काळात पेटली आणि त्यातून एक जन आंदोलन उभं राहिलंते जन आंदोलन शांततामय होतंमात्र काही देशद्रोहीफुटीरतावादी शक्तींनी या आंदोलनाचा वापर करून आसामला भारतापासून वेगळं करण्यासाठी ‘उल्फा’ नावाची दहशतवादी संघटना स्थापन करून खून खराबा सुरू केलायाही संघटनेला बांगलादेशातील काही शक्तीचीनपाकिस्तान यांच्या पाठिंब्यासहीत त्याला जागतिक शीतयुद्धाची चौकट होतीमॅकमोहन रेषा चीननं मान्य न केल्यामुळं अरुणाचल सततचा धगधगत असायचानागालँडमध्ये वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला तर १६ ऑगस्ट १९४७ पासूनच सुरुवात झाली होतीबघता बघता ती सशस्त्र चळवळीत रूपांतरित झाली होतीतिला आधी पूर्व पाकिस्तान आणि नंतर बांगलादेशचीनशीतयुद्धकालीन राजकारणातली अमेरिकात्यामुळं सीआयए आणि त्या भागात वावरणारे ख्रिश्चन मिशनरी या सगळ्यांची फूस होतीत्यातून वेगळ्या नागालँडची मागणी आणि त्यासाठी सशस्त्र लढा उभा राहिला होतादुर्दैवानं मणिपूरमध्येही तेचमिझोरम तेच.

अचानक आता पुन्हा दिसणं सुरू झालंय की या सगळ्या समस्या पुन्हा एकदा डोकं वर काढत आहेतत्यांची एकमेकांशी मिलीभगत आहेआतापर्यंत सुप्त वाटलेल्या अन्य फुटीरतावादीभयानक हिंसक शक्यता आता डोकं वर काढत आहेतम्हणून मला असं वाटतं की १९८० च्या दशकासारख्या भयानक कालखंडात आपण पुन्हा एकदा आहोत.

काश्मीरमध्ये कलम ३७० तर रद्द झालंत्यानुसार नव्यानं निवडणुका झाल्यालोकशाही प्रक्रिया पार पडलीमात्र देशद्रोही आणि फुटीरतावादी शक्ती तिथं खदखदत आहेतचकाश्मीरमधल्या निवडणुकांद्वारा दहशतवादी शक्ती विधानसभेत येणार की काय याची शंका बाळगायला जागा आहेपंजाबमध्ये पुन्हा एकदा खालिस्तानी चळवळ डोकं वर काढू पाहत आहेखालिस्तानी चळवळीला जनमानसातून आधार नसला तरी यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतून निवडून आलेले दोन खासदार खुल्लमखुल्ला ‘खालिस्तान’वादी आहेतत्यातला एक अमृत पाल सिंग तर तुरुंगात आहेतरी त्यानं निवडणूक लढवली आणि तो निवडून आलादेश फोडण्याची भाषा करणारे निवडून येत असतील तर दिसून येतं की त्यांना निदान त्यांच्या मतदारसंघात जनाधार आहेही धोक्याची गोष्ट आहेलोकसभेत खासदार म्हणून निवडले गेल्यानंतर लोकप्रतिनिधींना देशाच्या एकात्मतेचीअखंडतेची आणि संविधानाच्या रक्षणाची शपथ घ्यायची असतेतरीही ज्यांना खालिस्तान हवा आहेअसे दोघं संसदेत आहेतया शक्तींना पाकिस्तानचा पाठिंबा आहे.

वेगळ्या खालिस्तानच्या मागणीला कॅनडाचा पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यानं पाठिंबा दिला आहेखालिस्तानची मागणी करणार्‍या राजकीय पक्षासोबत परवापर्यंत तो सत्तेत होताआता त्यानं तो पाठिंबा काढून घेतला असला तरी आपलं सरकार पडणार नाही याची काळजी घेतली आहेकॅनडात खुल्लम खुल्ला वेगळ्या खालिस्तानच्या मागणीला पाठिंबा आहेगेल्या वर्षी कॅनडातल्या कोलंबिया प्रांतातल्या सरे या ठिकाणच्या गुरुद्वारात हरदीप सिंग निज्जरची हत्या झालीतर कॅनडाचा पंतप्रधान म्हणतोही हत्या भारतानं करवलीसध्या भारतकॅनडा संबंध पूर्वी कधीही नव्हतेइतके जास्त तणावपूर्ण आहेतअर्थात कॅनडा हे त्याच्या स्वतंत्र बुद्धीतून हे करत नसून त्याच्या खांद्यावरून अमेरिकेनं भारतावर रोखलेली ही बंदूक आहेअमेरिकेत राष्ट्रपती निवडणूक येऊ घातली आहेअमेरिकेच्या स्वतःच्या राजकीय अपरिहार्यता आहेतअमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाचं राजकारण ढोबळमानानं भारतविरोधी आणि त्यात मोदीभाजपविरोधी आहेभारतानं दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या गुरुपतवंत सिंग पन्नूला अमेरिका संरक्षण देतेतो पन्नू ‘आये दिन सौ बार’ भारताविरोधात बोलत राहतोआतासुद्धा तो म्हणतो की

१ ते १९ नोव्हेंबर या कालावधीदरम्यान तुम्ही एअर इंडियाच्या विमानानं जाऊ नकाकारण आम्ही ती विमानं उडवून देणार आहोतही म्हणे अमेरिकेची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या आहेआता अमेरिका आपल्यावर आरोप करते की भारताचा कुणी निखिल गुप्ता किंवा विकास यादव जो पूर्वी RAW मध्ये होता त्याने या पन्नूच्या हत्येचा कट रचला.

हे सर्व आंतरराष्ट्रीय राजकारणातले पेच आहेतअत्यंत निर्दयपणे हे राजकारण चालतंभारतावर अनेक कारणांनी दबाव आणणं हा त्याचा उद्देश आहेअमेरिकेला एका बाजूला चीनसमोर सक्षमपणे उभी राहू शकेल अशी शक्ती म्हणून भारत हवा आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या ताकदीवर भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभा राहीलहे अमेरिकेला खपत नाहीअमेरिकेला जणू भारत तिच्या ताटाखालचं मांजर बनायला हवं आहेतिकडं विस्तारवादी आक्रमक चीन आहेचअरुणाचलवर आजही दावा करतच आहेपाकिस्तानला पाठिंबा देत भारतविरोधी कारवायांना पाठबळ देतच आहेलडाखमध्ये गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष जरासा थांबून दोन देशांमध्ये सीमारेषेवर गस्त घालण्याचा निर्णय झाला असला तरी धोका कायम आहेचालू असलेलं रशियायुक्रेन युद्धआता त्या युद्धात उत्तर कोरियानं आपलं स्वतःचं सैन्य पाठवलंनाटो किंवा ईयूचं सदस्यत्व द्या अशी युक्रेनची मागणी आहेया युद्धात आम्ही अणुबॉम्बचा वापर करू अशी धमकी पुतीन यांच्या रूपात एका देशाचा राष्ट्राध्यक्ष धमकी देतोहे धोके कमी म्हणून की काय७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायल हमास युद्ध सुरू झालंजाणार्‍या दिवसागणिक या युद्धाची व्याप्तीदेखील वाढतच आहेहमासहिजबुल्ला यांच्या पाठीशी मुख्यतः इराण आहेयेमेनमधल्या हौथी या शियापंथीय संघटनेला इराणचा पाठिंबा आहेही संघटना इराणचं आखात किंवा लाल समुद्र यात चाचेगिरी करत व्यापाराला बाधा निर्माण करतेजगाचा फार मोठ्या प्रमाणावरचा तेलाचा व्यापार या भागातून चालतोयातून इस्रायलइराण युद्ध पेटण्याच्या शक्यता आहेतरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन इस्रायलला धमकी देतातकी तुम्ही इराणच्या अण्वस्त्रांना हात लावला तर आम्ही तुम्हाला बघून घेऊअमेरिका इस्रायलला सांगते (किंवा सांगितल्याचं नाटक करतेकी इराणच्या तेल विहिरींना काही करू नकाअशावेळी तैवानवर आक्रमण करून तो ताब्यात घेण्याची तयारी चीन करत असल्याच्या शक्यता दिसतातदोन दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या सेनेची पाहणी केलीत्यांनी केलेलं विधान आहे – युद्धासाठी तयार राहाएका राष्ट्राध्यक्षानं केलेलं हे विधान वरवरच आहे असं मानून चालणार नाहीशी जिनपिंग कोणत्या युद्धाकडं बोट दाखवत आहेतअशी सर्व जगाची कमालीची काळजीची स्थिती आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सेक्रेटरी जनरल अँटेनियो गुटेरेस काही दिवसांपूर्वी म्हणाले, the world is one mistake away from nuclear holocaust! संभाव्य अण्वस्त्र हल्ला आणि त्यातून होणार्‍या उद्ध्वस्ततेपासून जग एका चुकीच्या अंतरावर आहेकुणीतरी कुठेतरी दाबलेलं चुकीचं एक बटण जगामध्ये भडका उडवून देऊ शकेल.

तेव्हा महाराष्ट्रभारतजग एका अत्यंत धोकादायक कालखंडातून जात आहेत्यात मला जाणवतं की भारताचा सध्याचा काळ १९८० प्रमाणे धोक्याचा आहेया सर्व धोकादायक शक्यतांना बळ देणार्‍या देशांतर्गत शक्ती आहेतनक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवाद या दोघांची एकमेकांशी मिलीभगत आहेअवघ्या तीन दिवसांमध्ये शंभरपेक्षा जास्त विमानांना बॉम्ब ठेवल्याचे संदेश आलेएकाही विमानात असा बॉम्ब नसला तरी त्यातून उडणारा गोंधळविमानं रद्द होणंउड्डाणांना विलंब होणं आणि भारतात गोंधळ उडवून देण्याची ही योजना आहेरेल्वेचे मुद्दाम अपघात घडवून आणण्याचे देशभरात प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतंरूळ जोडणारे नटबोल्ट काढारुळांवर मोठे दगड ठेवून रेल्वे घसरवण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसतातरेल्वेच्या कामासाठी लागणार्‍या डायनामाइट गोडाऊनमध्ये काम करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यानं ते डायनामाइट रेल्वे उडवून देण्यासाठी रुळावर लावलंआपली ड्युटी संपवून घरी जाणार्‍या एका कर्मचार्‍याला ते दिसलंयेणार्‍या रेल्वेच्या दिशेनं हातवारे करत तो पळत सुटलारेल्वेच्या लोको पायलटला ते दिसलं आणि त्यानं रेल्वेला नीट ब्रेक लावलातामिळनाडूमध्ये मात्र असा रेल्वे अपघात टळू शकला नाहीम्हणून देशांतर्गत घातपात घडवून आणू इच्छिणार्‍या अनेक शक्ती काम करत आहेतआपल्याला भारत देश आणि भारतीय नागरिक या नात्यानं सावध राहतप्रार्थना करत आणि आपल्या परीनं काम करत हे चित्र पालटवून विकसित भारताच्या दिशेनं, ‘विश्वमित्र’ असलेल्या भारताच्या दिशेनं आपल्याला वाटचाल करायची आहेत्यासाठी आणि कायमच,

सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा!

आणिशुभ दीपावली!

Main

This will close in 0 seconds